Thursday, May 7, 2026
Homeक्राईमबलवाडी येथील 29 वर्षीय युवकाची आत्महत्या

बलवाडी येथील 29 वर्षीय युवकाची आत्महत्या

रावेर : राहत्या घरात एका 29 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 30 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजे पूर्वी उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मयूर रमेश पाटील वय २९ असे मयत युवकाचे नाव आहे.आत्महत्या करणाऱ्या मयूर पाटील यांच्या पत्नीचा याच महिन्यात २ तारखेला मृत्यू झाला आहे. तर त्यांची आई त्यांच्या लहानपणीच मयत झाली होती. तर त्यांच्या वडिलांची प्रकृती खराब असते. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. याबाबत मधुकर नामदेव पाटील यांनी दिलेल्या माहितीवरुन निंभोरा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. स.पो.नि. हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुरेश अढागळे तपास करत आहेत.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या