Thursday, May 7, 2026
Homeअध्यात्मिकमहाकुंभ मेळ्यासाठी योगी सरकारने जाहीर केला स्वतंत्र जिल्हा

महाकुंभ मेळ्यासाठी योगी सरकारने जाहीर केला स्वतंत्र जिल्हा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)अवघ्या दोन महिन्यांवर महाकुंभमेळा आलेला असताना देशभरातल्या भाविकांनी प्रयागराजला जाण्याची तयारी सुरू केली आहे. त्यातच उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाकुंभ मेळ्यासाठी एक आख्खा स्वतंत्र जिल्हाच योगी सरकारनं जाहीर केला आहे. या जिल्ह्याचं पूर्ण व्यवस्थापन स्वतंत्र असेल. शिवाय या जिल्ह्याचं नावदेखील महाकुंभमेळ्यावरूनच ठेवण्यात आलं आहे.

पुढील वर्षी १३ जानेवारी रोजी महाकुंभ मेळ्याला सुरुवात होईल. २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत हा भक्तीसोहळा चालेल. प्रयागराजमध्ये दर १२ वर्षांनी महाकुंभ मेळ्याचं आयोजन केलं जातं. यामध्ये लाखोंच्या संख्येनं देश-विदेशातून भाविक, साधू, तपस्वी येतात. प्रशासनाला या काळात या भागातील व्यवस्थापनासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला जातो. आत्तापर्यंत प्रयागराज जिल्हा प्रशासनाकडून महाकुंभमेळ्याचं व्यवस्थापन पाहिलं जात होतं. पण आता महाकुंभमेळ्यासाठी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा करण्यात आली आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या