Thursday, May 7, 2026
Homeजळगाव जिल्हामुख्यमंत्री कोण होणार ? सस्पेन्स कायम !

मुख्यमंत्री कोण होणार ? सस्पेन्स कायम !

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :– महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर आज जवळपास पाच दिवस उलटून देखील सत्ता स्थापन करण्याकरता महायुतीकडून अद्यापही हालचाल झालेली दिसून येत नाही. तसेच मुख्यमंत्री पदाचा तिढा अजून तरी सुटला नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

एकीकडे महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकी सुरू असून सरकार स्थापन करण्यात नेमक्या कोणत्या अडचणी आहेत याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर दावा दाखल केल्याचं बोलले जात असताना त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये नवी दिल्लीतील भाजप नेते जो निर्णय घेतील तो आपणास मान्य असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

तसेच आज राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून दिल्लीतील नेत्यांचा निर्णय मान्य असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. त्यामुळे भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्याने मोठा भाऊ या नात्याने भाजपाचा मुख्यमंत्री होईल यावर शिक्कामोर्तब होणे बाकी असले तरी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे.

या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत महाराष्ट्रातील या तीन्ही नेत्यांची गृहमंत्री अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्याबरोबर महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री पदाच्या नावाबाबत चर्चा होऊन सरकार स्थापनेचा निर्णय घेणार असल्याचे सूत्रांकडून कळते.

भाजप नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी मंदिरांमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी आरती साकडे, प्रार्थना देवाकडे केले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण हा सस्पेन्स अजून तरी कायम आहे. मुख्यमंत्री च्या नावाच्या घोषणाकडे महाराष्ट्र वासियांचे लक्ष लागले आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या