Sunday, April 19, 2026
HomeBlogस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत होण्याची शक्यता

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत होण्याची शक्यता

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत होण्याची शक्यता

मुंबई : राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेणार असल्याची माहिती पुढे येत आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका तर तिसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका पार पडण्याचे संकेत आहेत.

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या गट रचनांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून या रचनेला अंतिम मान्यता देण्याचे अधिकार आयोगाने विभागीय आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू असून गट आरक्षण व मतदार यादीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची आकडेवारी पाहिली तर एकूण महापालिका २९ (जालना व इचलकरंजी नवनिर्मित) असून सर्व महापालिका प्रशासक राजवटीखाली आहेत. नगरपरिषदा २४८ असून त्यांपैकी मुदत संपलेल्या व नवनिर्मित सर्वच नगरपरिषदा प्रशासकांच्या अखत्यारीत आहेत. राज्यात एकूण ३४ जिल्हा परिषदा आहेत. नगरपंचायतींची संख्या १४७ असून त्यांपैकी ४२ नगरपंचायती प्रशासकांच्या ताब्यात आहेत. अशा प्रकारे प्रशासक असलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतींची एकत्रित संख्या २२० इतकी आहे. पंचायत समित्या एकूण ३५१ असून त्यापैकी तब्बल ३३६ समित्या प्रशासकांच्या अखत्यारीत आहेत.

 

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या