Thursday, April 30, 2026
Homeक्राईमअटलांटा प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

अटलांटा प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

अटलांटा प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

जळगाव महापालिकेतील कथित आर्थिक गैरव्यवहारावर शासनाची थेट दखल

जळगाव : प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेशी संबंधित अटलांटा कन्स्ट्रक्शन प्रकरणाला अखेर निर्णायक वळण मिळाले आहे. मुंबईतील ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले.

आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप
या प्रकरणात अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध नगरसेवक अरविंद देशमुख यांनी यापूर्वीच जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत महापालिकेची आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि कोट्यवधी रुपयांच्या अपहाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांसमोर सविस्तर मांडणी
या पार्श्वभूमीवर नामदार गिरीश महाजन, आमदार राजू भोळे, नंदू आडवाणी, मनोज काळे आणि तक्रारदार अरविंद देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी देशमुख यांनी संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा देत तक्रारीतील मुद्दे स्पष्ट केले.

महापालिका आयुक्तांना तात्काळ निर्देश
प्रकरण ऐकल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढोरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून तात्काळ सरकारी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.

तपासाला मिळणार गती
मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे या प्रकरणातील तपास प्रक्रियेला अधिकृत गती मिळण्याची शक्यता आहे. आधीच दाखल झालेल्या तक्रारीमुळे प्रकरणाची गंभीरता अधोरेखित झाली होती; आता शासनस्तरावरून कारवाईचे निर्देश मिळाल्याने दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

राजकीय व प्रशासकीय हालचालींना वेग
या घडामोडीनंतर जळगाव शहरात मोठी राजकीय आणि प्रशासकीय हालचाल सुरू झाली असून, अटलांटा प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून, दोषींवर कठोर कारवाई होईल,” असा स्पष्ट संदेश शासनस्तरावरून देण्यात आला आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या