Thursday, May 7, 2026
Homeक्राईमकंडारीत किरकोळ वादातून तरुणाचा खून

कंडारीत किरकोळ वादातून तरुणाचा खून

कंडारीत किरकोळ वादातून तरुणाचा खून

भुसावळ (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातील रहिवासी जितेंद्र राजेंद्र साळुंखे-कोळी (वय ४०) या तरुणाचा भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे किरकोळ वादातून धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना रविवार (ता. ५) रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या दरम्यान घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत जितेंद्र साळुंखे हा पत्नी व तीन मुलांसह जळगावात राहत होता आणि हातमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. रविवारी तो जळगावच्या माजी महापौरांचा मुलगा व आणखी दोघांसोबत कंडारी येथे एका कामानिमित्त गेला होता.

दरम्यान, ते चौघे एका हॉटेलवर थांबले असता मद्यपान करताना किरकोळ वाद झाला. वाद चिघळताच हाणामारी झाली आणि त्या दरम्यान संशयितांनी धारदार शस्त्राने वार करत जितेंद्रचा जागीच खून केला. गंभीर अवस्थेत त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पीएसआय इकबाल सय्यद तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. संशयितांचा शोध सुरू असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जितेंद्रच्या मृत्यूनंतर गेंदालाल मिल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. किरकोळ वादातून घडलेल्या या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या