Thursday, May 7, 2026
Homeक्राईमकर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून संपवले जीवन 

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून संपवले जीवन 

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून संपवले जीवन 

धरणगाव तालुक्यातील चमगाव येथील घटना

जळगाव प्रतिनिधी 

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने शेतामध्ये असलेले विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रयत्न केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील चमगाव येथे घडली होती .मात्र या 45 वर्षे शेतकऱ्याचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कर्जाला कंटाळून राजेश्वर आनंदा सावंत (वय ४५) असे मयत शेतकऱ्याचे नाव असून याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

धरणगाव तालुक्यातील चमगाव येथे राजेश्वर सावंत हे

गेल्या काही वर्षापासून त्यांनी शेती करण्यासाठी कर्ज काढले होते. पण सततची नापिकी आणि कर्जबाजाराला कंटाळून त्यांनी सोमवार दि. २७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता शेतात असताना विषारी औषध घेतले. त्यांचे प्रकृती खालावल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवार दि. ३० जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, कमलाबाई पत्नी आशाबाई आणि सागर, विशाल ही दोन मुले असा परिवार आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या