Tuesday, July 8, 2025
HomeBlogभरधाव बसची दुचाकीला धडक, जळगावचा तरुण जागीच ठार दोघे गंभीर जखमी 

भरधाव बसची दुचाकीला धडक, जळगावचा तरुण जागीच ठार दोघे गंभीर जखमी 

भरधाव बसची दुचाकीला धडक, जळगावचा तरुण जागीच ठार दोघे गंभीर जखमी

भुसावळ (प्रतिनिधी) : पिंपरुड-आमोदा नदीदरम्यान मोर पुलाजवळ रविवारी (२९ जून) रात्री सुमारास झालेल्या भीषण अपघातात मयूर श्रीराम गवळी (वय ३२, रा. इंद्रप्रस्थनगर, जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त दोघे फैजपूर येथील रहिवासी आहेत.

मयूर गवळी, जयेश सुधाकर पाटील (वय २९) आणि चिरिया मनोज गोहर (वय २९, सर्वजण फैजपूरहून जळगावकडे मोटारसायकल क्रमांक एमएच १९ ईएफ ७७०४ ने प्रवास करत होते. दरम्यान, मोर पुलाजवळ समोरून भरधाव वेगाने आलेल्या एस.टी. बस (क्रमांक एमएच १४ एमएच १०८३) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना भुसावळ येथील उपजिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयूर गवळी यांना तपासणीनंतर मृत घोषित केले. इतर दोघांना गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी जळगाव सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले.

या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मयूरच्या निधनाने जळगाव हळहळले
मयूर गवळी हे जळगावात ‘महाबासुंदी’ चहा विक्रेते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा मनमिळाऊ, हसतमुख स्वभाव आणि मदत करण्याची वृत्ती यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क होता. त्यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच अनेक नातेवाईक, मित्र आणि परिचितांनी घटनास्थळी गर्दी केली. मयूर यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी आणि तीन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने जळगाव शहरात शोककळा पसरली आहे.

ताज्या बातम्या