Friday, October 3, 2025
Homeक्राईमघरात कुणी नसताना १५ वर्षीय मुलीची आत्महत्या; कारण अस्पष्ट

घरात कुणी नसताना १५ वर्षीय मुलीची आत्महत्या; कारण अस्पष्ट

घरात कुणी नसताना १५ वर्षीय मुलीची आत्महत्या; कारण अस्पष्ट

जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने घरात एकटी असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना २ सप्टेंबर रोजी उघडकीस आली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृत मुलीचे नाव जयश्री लक्ष्मण चव्हाण (वय १५) असे आहे. जयश्रीची आई रोजंदारीच्या कामावर गेली होती, तर लहान भाऊ शिकवणीसाठी बाहेर गेला होता. संध्याकाळी शेजारील मुलींसोबत तिने गणपतीसाठी दुर्वा आणल्या. त्यानंतर पाय दुखत असल्याने गोळ्या आणल्या. मात्र काही वेळातच तिने राहत्या घरात गळफास घेतला.

आजोबा घरी आले असता मुलगी गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तत्काळ तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास पो.उ.नि. अशोक काळे करीत आहेत. मुलीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

ताज्या बातम्या