Saturday, May 23, 2026
Homeक्राईममोदींना ‘झालमुरी’ खाऊ घालणाऱ्या विक्रेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या; पाक-बांगलादेशातून येताहेत फोन

मोदींना ‘झालमुरी’ खाऊ घालणाऱ्या विक्रेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या; पाक-बांगलादेशातून येताहेत फोन

मोदींना ‘झालमुरी’ खाऊ घालणाऱ्या विक्रेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या; पाक-बांगलादेशातून येताहेत फोन

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान यांना ‘झालमुरी’ खाऊ घालून चर्चेत आलेले दुकानदार विक्रम साहू यांना आता जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशातून आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून सतत धमकीचे फोन येत असल्याचा दावा विक्रम साहू यांनी केला असून त्यांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान विक्रम साहू यांच्या दुकानाला भेट देत ‘झालमुरी’चा आस्वाद घेतला होता. त्यावेळी मोदी आणि साहू यांच्यात झालेला संवाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या घटनेनंतर विक्रम साहू हे अचानक प्रसिद्धीझोतात आले होते. मात्र, हीच प्रसिद्धी आता त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबासाठी धोकादायक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

विक्रम साहू यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि बांगलादेशातून सतत फोन व व्हिडिओ कॉलद्वारे धमक्या दिल्या जात आहेत. फोन करणारे अश्लील भाषेत शिवीगाळ करत असून बॉम्बने उडवून देण्याची धमकीही देत आहेत. त्यामुळे कुटुंबीय भीतीच्या सावटाखाली जगत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भीतीमुळे आता अनेक अनोळखी फोन उचलणेही बंद केल्याचे साहू यांनी सांगितले.

धमकी देणारे थेट पंतप्रधान मोदींचे नाव घेत नसले तरी मोदी यांनी त्यांच्या दुकानात ‘झालमुरी’ खाल्ल्यानंतरच या धमक्यांना सुरुवात झाल्याचा दावा साहू यांनी केला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत पश्चिम बंगाल पोलिसांनी तपास सुरू केला असून विक्रम साहू यांच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सरकारने स्वतःसह कुटुंबाला योग्य सुरक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या