Saturday, April 18, 2026
HomeBlogउन्हाळ्यात पाणी-वीजपुरवठा अखंडित ठेवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्पष्ट निर्देश

उन्हाळ्यात पाणी-वीजपुरवठा अखंडित ठेवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्पष्ट निर्देश

उन्हाळ्यात पाणी-वीजपुरवठा अखंडित ठेवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्पष्ट निर्देश

जिल्ह्यात टँकरची गरज नाही; १४ विहिरी अधिग्रहित, पाणीटंचाईवर नियंत्रण

जळगाव : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी व वीजपुरवठा ही अत्यावश्यक सेवा कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित पाणीटंचाई व वीजपुरवठा आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीला मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत सोनवणे, अनिल पाटील, अमोल जावळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी महावितरणला पाणीपुरवठा योजनांमध्ये वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आदेश दिले. तसेच जलजीवन मिशनअंतर्गत येणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देशही दिले.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील पाणीस्थिती सध्या नियंत्रणात असून प्रमुख प्रकल्पांमध्ये सुमारे ४७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा एप्रिलपर्यंत एकही टँकर सुरू करावा लागलेला नाही, तर १४ ठिकाणी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अपूर्ण पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासह अनधिकृत पाणीउपसा रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याचे आदेशही बैठकीत देण्यात आले.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या