Thursday, May 7, 2026
Homeक्राईमनागपुरातील अनोखी प्रेमकहाणी : तीन मुलांच्या आईने १६ वर्षीय प्रियकरासह बालाघाटमध्ये थाटला...

नागपुरातील अनोखी प्रेमकहाणी : तीन मुलांच्या आईने १६ वर्षीय प्रियकरासह बालाघाटमध्ये थाटला संसार

नागपुरातील अनोखी प्रेमकहाणी : तीन मुलांच्या आईने १६ वर्षीय प्रियकरासह बालाघाटमध्ये थाटला संसार

नागपूर वृत्तसंस्था

सिनेमा किंवा कादंबरीत शोभेल अशी धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. ३८ वर्षीय विवाहित महिलेने १६ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत पलायन करून मध्यप्रदेशातील बालाघाट येथे संसार थाटल्याचे उघड झाले आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर पोलिसांनी त्यांचा शोध लावला असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ओळखीपासून प्रेमसंबंधांपर्यंतचा प्रवास

संबंधित महिला आणि १६ वर्षीय मुलाची ताजबाग येथे ओळख झाली होती. महिलेने त्याचा मोबाइल क्रमांक घेतला आणि दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. पतीच्या दारूच्या व्यसनामुळे कंटाळलेल्या या महिलेला अल्पवयीन मुलाकडे ओढ वाटू लागली. तिने त्याच्याशी जवळीक वाढवली आणि घरात कुणी नसताना अनेकदा त्याला घरी बोलावले.

डिसेंबरमध्ये पलायन आणि नव्या संसाराची सुरुवात

डिसेंबर महिन्यात संधी साधून महिलेने अल्पवयीन प्रियकरासोबत पलायन केले आणि ते थेट मध्यप्रदेशातील बालाघाट येथे पोहोचले. तेथे महिलेने आपले दागिने विकून भाड्याने खोली घेतली. दोघांनी खासगी नोकरी सुरू करून आपले नवे आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने त्याचे कुटुंबीय अत्यंत अस्वस्थ झाले. त्यांनी वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हे शाखेच्या मानव तस्करी विरोधी पथकाने तांत्रिक तपासाद्वारे दोघांचा ठावठिकाणा शोधला आणि बालाघाटमध्ये  त्यांना ताब्यात घेतले.

 

पोलिसांनी अल्पवयीन मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले, तर महिलेला तिच्या पतीच्या हवाली करण्यात आले.

चार महिन्यांत दुसऱ्यांदा अपहरणाचा प्रकार

विशेष म्हणजे, या महिलेने चार महिन्यांत दुसऱ्यांदा अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑक्टोबर महिन्यातही तिने मुलाला आमिष दाखवून पुण्याला नेले होते. त्यावेळीही वाठोडा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पाच दिवसांनी अल्पवयीन मुलगा स्वतःहून परत आला होता.

या अनोख्या प्रकरणामुळे नागपूर शहरात आश्चर्य आणि चर्चा सुरू झाली आहे. एकतर अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे, तर दुसरीकडे पोलिसांसाठीही ही घटना धक्कादायक ठरली आहे.

 

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या