Thursday, May 7, 2026
HomeBlogडॉ करीम सालार यांचा ‘ जीवन गौरव स्मृति ‘ सन्मानाने गौरव

डॉ करीम सालार यांचा ‘ जीवन गौरव स्मृति ‘ सन्मानाने गौरव

डॉ करीम सालार यांचा ‘ जीवन गौरव स्मृति ‘ सन्मानाने गौरव

जळगाव प्रतिनिधी I इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ करीम सालार यांनी इकरा शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून खानदेशातील मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाच्या आर्थिक, सामाजिक ,साहित्यिक, सांस्कृतिक प्रगती करिता तसेच राजकारणातील नगरपालिकेतील नगरसेवक ते महापौर म्हणून केलेल्या जळगावकरांच्या समाजसेवेबद्दल विवेक ठाकरे यांच्या ग्राम गौरव मीडिया हाऊसच्या तृतीय वर्धापनानिमित्त ‘ ज्ञान कर्मी सन्मान व विशेषांक मुखपृष्ठ प्रकाशन ‘ समारंभात जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांच्या शुभहस्ते ‘ जीवन गौरव स्मृति ‘ सन्मानाने त्यांना गौरवान्वित करण्यात आले.

कार्यक्रमात आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर ,पत्रकार सुरेश उज्जैनवाल आदि अतिथी म्हणून उपस्थित होते .आपल्या अध्यक्षीय भाषणात अरुण भाई गुजराथी म्हटले कि खानदेशातील इकरा तसेच अन्य भाषिक शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थी घडविण्याचे राष्ट्र निर्माणचे महत्वपूर्ण कार्य संपन्न होत आहे. हे या संस्थाचालक व पदाधिकाऱ्यांच्या ईमानदारी, प्रखर राष्ट्रीय भावना,दूरदृष्टी, अथक मेहनत , यशस्वी नेतृत्वामुळे संपन्न होत आहे. अशा सेवा भावी नेतृत्वाच्या कार्याला मीच नव्हे तर देश सलाम करतो.

सत्काराला उत्तर देताना डॉ करीम सालार म्हटले कि अभिनेता दिलीप कुमार यांच्या शोच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम समाजाच्या आर्थिक पाठिंब्या मुळे माझ्या व माझ्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यावर विश्वास ठेवून इकराचे रोप 1980 मध्ये लावण्यात आले. आता ह्या रोपाचे वटवृक्षात रूपांतर झालेले आहे.अनेक विद्यार्थी देश विदेशात विद्यालयातील , महाविद्यालयातुन मिळवलेल्या ज्ञान, कौशल्यांच्या बळावर रोजगारातून समाजसेवा करीत आहे. जळगाव मध्ये 1970 मध्ये उद्भवलेल्या मोठ्या धार्मिक दंगली नंतर इकरा तसेच इतर समाजातील शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक सौहार्द , सलोखा, सहिष्णुता तसेच राष्ट्रीय एकात्मता भक्कम होण्यास हातभार लागलेला आहे. कार्यक्रमात खानदेशातील इतर संस्था चालकांचा ही सन्मान करण्यात आला.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या