Thursday, May 7, 2026
Homeताज्या बातम्याजळगाव जिल्ह्यासह राज्यात थंडीचा कडाका !

जळगाव जिल्ह्यासह राज्यात थंडीचा कडाका !

पुणे : उत्तरेकडून राज्याच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह तीव्र झाले आहेत. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत थंडीची लाट आली आहे. सोमवारीही राज्यात सर्वात नीचांकी तापमान अहिल्यानगर येथे ५.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. राज्यातील काही जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट असल्याचे हवामान विभागाने कळवले आहे.

राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. थंड वाऱ्यांमुळे अनेक शहरांच्या किमान तापमानात झपाट्याने घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्हे गारठले आहेत. सोमवारी अनेक भागांत १ ते ३ अंशांनी किमान तापमानात घट झाली आहे. तर, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड तसेच विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट आहे.

राज्यात सोमवारी हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली. विदर्भात काही ठिकाणी तर कोकणात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. १७ व १८ डिसेंबर रोजी राज्यात हवामान कोरडे राहणार आहे, तर १९ डिसेंबरपासून पुढील चार दिवस कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहणार आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या