Sunday, September 20, 2026
Homeखानदेशराज्यातील वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी: पुढील ५ वर्षांत वीजदरात २६% कपात!

राज्यातील वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी: पुढील ५ वर्षांत वीजदरात २६% कपात!

राज्यातील वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी: पुढील ५ वर्षांत वीजदरात २६% कपात!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘एक्स’वरून माहिती

मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्रात आगामी पाच वर्षांत वीजदर टप्प्याटप्प्याने २६ टक्क्यांनी कमी होणार आहेत. ही कपात पहिल्या वर्षी १० टक्क्यांनी सुरू होणार असून, पुढील चार वर्षांत हळूहळू आणखी कपात केली जाणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्याच्या इतिहासात प्रथमच वीजदर कपात करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. महावितरणच्या याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) दिलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे.”

सर्व वर्गातील ग्राहकांना लाभ

मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार, या निर्णयाचा घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना मोठा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे, राज्यातील ७० टक्के ग्राहक १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरतात, त्यामुळे या ग्राहकांना १० टक्क्यांपर्यंत दर कपातीचा थेट फायदा होईल.

“पूर्वी दरवाढीच्या याचिकाच दाखल केल्या जात असत. मात्र यंदा पहिल्यांदाच महावितरणने दर कपात करण्यासाठी याचिका दाखल केली. त्या पार्श्वभूमीवर एमईआरसीने दिलेला हा निर्णय ऐतिहासिक आहे,” असेही फडणवीस यांनी नमूद केले.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या