Thursday, May 7, 2026
HomeBlogदोन कुटुंबांमध्ये मारहाण; परस्परविरोधात गुन्हे दाखल

दोन कुटुंबांमध्ये मारहाण; परस्परविरोधात गुन्हे दाखल

दोन कुटुंबांमध्ये मारहाण; परस्परविरोधात गुन्हे दाखल

जळगाव : जुन्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या भांडणात परस्परांना मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. ही घटना २४ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता तांबापुरा परिसरात घडली.

पहिली फिर्याद
या प्रकरणी संजय विनोद गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित कालिया सुलतान आणि शारुख गयासोद्दीन कवीरोद्दीन (दोघे रा. तांबापुरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी फिर्याद
तर रिजवान गयासुद्दीन शेख (वय २७, रा. गीतम नगर, तांबापुरा) यांच्या तक्रारीनुसार संजना गोसावी आणि अमान (पूर्ण नाव उपलब्ध नाही, रा. तांबापुरा) यांच्याविरुद्धही अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तपास सुरू
या परस्परविरोधी फिर्यादींवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली असून तपास पोलीस हवालदार रामदास कुंभार करीत आहेत.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या