Sunday, September 20, 2026
Homeताज्या बातम्याहिंदी सक्तीचा निर्णय रद्द; फडणवीस सरकारचा यु-टर्न

हिंदी सक्तीचा निर्णय रद्द; फडणवीस सरकारचा यु-टर्न

हिंदी सक्तीचा निर्णय रद्द; फडणवीस सरकारचा यु-टर्न

मुंबई, 29 जून 2025 – राज्यात हिंदी सक्तीविरोधात वाढलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा धोरणावरील दोन्ही शासन निर्णय रद्द केल्याची घोषणा केली आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी 5 जुलै रोजी मुंबईत विराट मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारने पावले मागे घेतली. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार पहिलीपासूनच हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला विरोध झाला होता. आता फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे मराठी आणि इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये हिंदी तिसऱ्या भाषेची सक्ती होणार नाही, असे स्पष्ट झाले आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या