Friday, May 1, 2026
HomeBlogराज्यात मान्सून सक्रीय; २१ जणांचा मृत्यू, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

राज्यात मान्सून सक्रीय; २१ जणांचा मृत्यू, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

राज्यात मान्सून सक्रीय; २१ जणांचा मृत्यू, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

मुंबई : राज्यात यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला असून, सध्या तो मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सक्रीय झाला आहे. गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे राज्यात २१ जणांचा मृत्यू झाला असून, २२ प्राण्यांचा बळी गेला आहे. ही माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. सर्वाधिक मृत्यू पुणे आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी तीन जणांच्या नोंदीनिशी झाले आहेत.

राज्यात रविवारी मान्सूनने प्रवेश केला असून, पुढील २४ तासांत तो मुंबई आणि पुण्यापर्यंत पोहोचला. हवामान विभागानुसार येत्या दोन दिवसांत मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे ईशान्येकडील राज्ये, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे.

विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

गुरुवारी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवाडा आणि पुणे, सातारा जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जळगाव शहरात रात्री मुसळधार पाऊस

बुधवारी दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर रात्रीच्या वेळी जळगाव शहरात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला. हा पाऊस मान्सूनचा भाग होता, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

जालना जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

जालना जिल्ह्यात बदनापूर व परतूर तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून, १७ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. मे महिन्यातच दुधना, सुखना यांसारख्या नद्यांमध्ये पाणी वाहताना दिसल्यामुळे नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

 

वाशीम जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातही पावसाचा जोर कायम असून, फणसवाडी येथील शेतकऱ्यांचे मका व भाजीपाला पिके नष्ट झाली आहेत.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या