Thursday, April 30, 2026
Homeक्राईमबेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा विहिरीत मृतदेह आढळला

बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा विहिरीत मृतदेह आढळला

पाळधी, ता. धरणगाव :-गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा ग्रामपंचायतच्या विहिरीत मृतदेह आढळून आल्याची घटना पाच रोजी उघडकीस आली असून या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.अशोक अमृत लंके (वय ४२) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अशोक लंके हे घरात कोणालाही न सांगता गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता झाल्याने त्यांचे वडील अमृत लंके यांनी पाच रोजी पारधी पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केले होते. मात्र मात्र ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला दुपारी तीन वाजेच्या सुमारास अशोक लंके यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. या ठिकाणी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान अशोक लंके यांच्यावर कर्ज असल्याने त्यांनी या विवंचनेतून जीवन संपवल्याची चर्चा होत आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या