Thursday, April 16, 2026
HomeBlogधुपी येथे शेतकऱ्याच्या घरातून ५७ हजारांची चोरी ; दरवाज्याचा कडीकोंडा तोडून चोरट्याचा...

धुपी येथे शेतकऱ्याच्या घरातून ५७ हजारांची चोरी ; दरवाज्याचा कडीकोंडा तोडून चोरट्याचा प्रवेश

अमळनेर (प्रतिनिधी) – शेतीच्या मशागतीसाठी बँकेतून काढलेले ५७ हजार ५०० रुपये अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा तोडून चोरून नेल्याची घटना अमळनेर तालुक्यातील धुपी येथे ७ जुलै रोजी उघडकीस आली. या प्रकरणी अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुपी येथील सुभाष श्रीराम जाधव यांनी ३० जून रोजी शेतीसाठी आवश्यक खर्च भागवण्यासाठी बँकेतून ५७ हजार ५०० रुपये काढले होते. त्यांनी हे पैसे घरातील लोखंडी कपाटात ठेवले होते. त्याच दिवशी ते नाशिकला गेले होते. घराला कुलूप लावून घराची किल्ली गावातीलच दिलीप माधवराव देसले यांच्याकडे दिली होती.

७ जुलै रोजी देसले हे लाईट सुरू करण्यासाठी घरात गेले असता, घराच्या दरवाज्याचे कुलूप व कडीकोंडा तोडलेले आढळले. त्यांनी तातडीने जाधव यांना फोन करून माहिती दिली. जाधव घरी आल्यानंतर त्यांनी पाहिले असता, लोखंडी कपाटातील लॉकर फोडून त्यातील रोख रक्कम गायब असल्याचे दिसून आले.

या प्रकरणी सुभाष जाधव यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 454, 457, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या