Wednesday, April 15, 2026
Homeजळगाव जिल्हाआठवडे बाजारातील चोरीला गेलेले ३३ मोबाईल पोलिसांनी शोधून केले मूळ मालकांना परत

आठवडे बाजारातील चोरीला गेलेले ३३ मोबाईल पोलिसांनी शोधून केले मूळ मालकांना परत

आठवडे बाजारातील चोरीला गेलेले ३३ मोबाईल पोलिसांनी शोधून केले मूळ मालकांना परत
एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील आठवडे बाजारात खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले होते. मात्र, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने चोख तपास करत ३३ मोबाईल हस्तगत केले असून ते त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी तपासाच्या दरम्यान मोबाईलची माहिती तांत्रिक पद्धतीने शोधून काढली आणि मोबाईलचे मूळ धारक शोधून त्यांच्याशी संपर्क साधला. यानंतर संबंधित नागरिकांना पोलीस ठाण्यात बोलावून मोबाईल परत देण्यात आले.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

मोबाईल शोधमोहीमेत पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, पोलीस नाईक प्रदीप चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोबाईल चोरीच्या घटना उघडकीस येत असून नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी पोलिस यंत्रणा सतत सज्ज असल्याचा विश्वास या कारवाईतून पुन्हा एकदा दृढ झाला आहे.

आनंद गोरे
आनंद गोरेhttps://www.divyabhararinews.com
मुख्य संपादक दिव्य भरारी न्यूज : पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरासह खान्देश तसेच राज्यातील क्राईम, राजकीय , पर्यावरण, सांस्कृतिक, , व्यापार उद्योग, शैक्षणिक, क्षेत्रातील घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा लोकसभा, निवडणुका ंच्या बातम्या राजकीय विश्लेषण चा अनुभव स्थानिक केबल न्यूज चैनल मधून पत्रकारितेला सुरुवात. नंतर दैनिक लोकपत्र, दैनिक देशाधार, देशोन्नती, जनशक्ती, गावकरी, लोकशाही,बातमीदार, केसरी राज, जळगाव माझा, साईमत, जनसंग्राम न्यूज, आधी ठिकाणी उपसंपादक वरिष्ठ उपसंपादक , ब्युरो चीफ, संपादकीय प्रमुख, वृत्तसंपादक आदी पदांवर यशस्वीरित्या कामकाज केले आहे.

ताज्या बातम्या